Sunday, November 13, 2011

Baby I'm coming home ....

साऱ्या निराशा, क्लेष, वेदना
विसरतो मी तिथे
तिच्या पंखाच्या मउ उबेला
आसुसला मी इथे X 2

इथे धुंद वारा श्वास फुलवी
प्रेमात तुझीया विसरूनी

क्षण संगतीचे मन भुलविती
स्वर्ग सुखांची अनुभूती . . .


There's a place where I love to go
It’s where I'm never alone
You can rest your soul when you're weary and cold
Baby I'm coming home

Leads -


तिच्या शब्दांची ही अदा
अन नयनांची मधुशाला X2

तिच्या अधरांची बोलावणी
दैवी सुखाच्या आठवणी

हे जग चिरंतन तुझामुळे
हे तच आनदानी की स्मित तुझे

तुझिया हृदयी , तुझिया मनी . . .

जगू देना मला

इथे धुंद वारा श्वास फुलवी
प्रेमात तुझीया विसरूनी

क्षण संगतीचे मन भुलविती
स्वर्ग सुखांची अनुभूती . . .

There's a place where I love to go
It's where I'm never alone
You can rest your soul when you're weary and cold
Baby I'm coming home . . .

साऱ्या निराशा, क्लेष, वेदना
विसरतो मी तिथे
तिच्या पंखाच्या मउ उबेला
आसुसला मी इथे ....


http://www.reverbnation.com/artist/artist_songs/353249

Saturday, March 19, 2011

होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्या... !!!

तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्या... !!!

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.

फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणार्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसर्या दिवशी सुरू होणार्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात.

तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्या... !!!

Sunday, January 16, 2011

तू साध घालशील......

तू साध घालशील याची मला खात्री आहे,
तू साध घालशील याची मला खात्री आहे,
म्हणुनच आजही मी तुझी वाट बघत आहे.

तुझ्या प्रत्येक साधेला माझी नक्कीच साथ मिळेल.
फ़क्त एकदा साध घालून तर बघ...
तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर नक्कीच मिळेल.

तू साध घालशील ना......

Sunday, January 9, 2011

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे...

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
मना सारखा अर्थ लागायचे, अन मना सारखे शब्द ही यायचे.

नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे.

उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे

असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
रुतून रुतुनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे,

मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मना भोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.

आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता पावलेही दुखू लागले की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे.

----- सौमित्र (किशोर कदम)

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ......

आज एक लेख वाचनात आला, खुप आवडला.. म्हणुन खास तुमच्या करीता....

आज आम्ही आपल्याशी "मुली" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील). ;)

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची , मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे "संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसा, लोचट मेला ...." या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही. ;D



दुसरा प्रकार आहे "आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही. :)


तिसरा प्रकार "कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!! इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे ???ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!! 8)



चौथा प्रकार "मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात. ???



महाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी "आमच्यावर स्वतंत्र लेख हवा" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.

Friday, December 31, 2010

नववर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!!

नववर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..... Happy New Year 2011...!!!

What the future holds for us depends on what we hold for the future. May all your days be beautiful and bright. Keep your face to the sunshine; let a series of happy thoughts run through your mind. They will show on your face.

One more year has completed and given lot of things and memories. Not sure what is 'Good' in saying 'GoodBye'. But still we says goodbye to the things which are going.... I am hoping to learn from yesterday, live for today and hope for tomorrow.


Once again wish you all a Very Happy New Year...2011..!!!


Tuesday, December 28, 2010

Life is beautiful...!!!

I once had a friend who grew to be very close to me. Once when we were
sitting at the edge of a swimming pool, she filled the palm of her hand
with some water and held it before me, and said this:
"You see this water carefully contained on my hand? It symbolizes Love."

This was how I saw it: As long as you keep your hand caringly open and
allow it to remain there, it will always be there. However, if you attempt to
close your fingers round it and try to posses it, it will spill through the
first crack it finds.

This is the greatest mistake that people do when they meet love...they try
to posses it, they demand, they expect... and just like the water spilling
out of your hand, love will retrieve from you .

For love is meant to be free, you cannot change its nature. If there are
people you love, allow them to be free beings.

Give and don't expect.
Advise, but don't order.
Ask, but never demand.

It might sound simple, but it is a lesson that may take a lifetime to truly
practice. It is the secret to true love. To truly practice it, you must
sincerely feel no expectations from those who you love, and yet an
unconditional caring."

Passing thought... Life is not measured by the number of breaths we take;
but by the moments that take our breath away.....

Life is beautiful!!! Live it!!! ...

Article by Swami Vivekananda

पुण्यात बंद..!!!

पुण्यात बंद..!!! लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविल्याच्या निषेधार्थ पुणे बंद. दुकाने, प्रमुख बाजारपेठा, रिक्षा बंद होत्या. शहरात ५८ बसगाड्यांवर दगडफेक झाली. नुकसान ही भरपूर झाले.... पण कुणाचे??

बस हेच बाकी होत......

पुणे एक शांत शहर... ह्या प्रतिमेला कालिम्बा फासनारे हे राजकारणी. याना लाज का वाटत नाही... का यानि ठरावलच आहे की राजकारणी म्हणजे लाज नसलेले.. असाच "आदर्श" ठेवायचा.

च्यायला त्या पुतळ्याने हयांचे काय वाकडे केल होत? की याना तो पुतळा हलवावा लागला. बहुतेक यांची डोकी ठिकाणावर नाहीत. आता राजकारण्यानकड पुण्यात काही करण्यासाठी उरल नाहीए का?

बर दोष कुणाचा... जाणी पुतळा हलविला त्यांचा? की जाणी बंदचे आवाहन केल त्यांचा? की कार्यकर्त्यांचा... जाणी बसगाड्यांवर दगडफेक केली. दुकाने, प्रमुख बाजारपेठा, रिक्षा बंद करायला लोकाना भाग पाडले....अणि भरपूर नुकसान केले... पण कुणाचे??

मला वाटत जर नेता चुकत असेल तर कार्यकर्त्यांची जवाबदारी आहे, की त्यानी बंड करावे बंद नाही.

Tuesday, December 14, 2010

काळाचे रहस्य...

श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट...

घायाळ झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता. आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम लक्ष्मणाला सांगत होते की,
त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून 'काळाचे रहस्य' आत्मसात कर!
रामाच्या त्या बोलण्याने संभ्रमित झालेल्या लक्ष्मणाला शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, शिघ्रता कर अन्यथा रावणाच्या अंता बरोबरच ते रहस्य सुध्दा कायमचे अंत पावेल. मरणासन्न रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता, आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती स्विकारली.
त्याने लक्ष्मणाला सांगितले की त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक टोकदार काडी घेऊन ये. लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले, आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर आरपार खोच. लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून प्रथम स्पर्ष करून गेले ते सोन्याचे झाले, दुसरे रुप्याचे झाले अन तिसरे आहे तसेच राहीले. रावण म्हणाला, हे आहे काळाचे रहस्य.
क्षणमात्र जरी विलंब झाला तरी सोन्याचे रुपे होते.
म्हणून,
जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र ही विलंब न करता 'सोने' कर !

Saturday, December 4, 2010

क्षणभर विश्रांती.....

क्षणभर विश्रांती..... नक्कीच हवी असते. या व्यस्त जीवनात काही गोष्टीनचा विचार करण्यासाठी खरच हवी असते... क्षणभर विश्रांती...!!! ...खरच पहा जरा घेउन क्षणभर विश्रांती; अणि विचार करा त्या प्रश्नांचा , जे सुरु होतात 'क' पासून. उदाहरनार्थ.. का? कशासाठी? कुणासाठी? कधी? कुठे? अणि किती? इत्यादी.... फ़क्त हे सगळे प्रश्न स्वता:ला करा.
खरच कळेल ....किती गरज आहे क्षणभर विश्रांतीची...!

Sunday, August 15, 2010

Freedom.... Really we got it???

For me the freedom is the belief that one person can't make a difference, and the fear of standing out from the crowd and challenging authority. Freedom is self-determinance; it is the condition of minimal constraint. Naturally, in a society or community, there has to be some constraints — the burglar cannot have the freedom to steal, the thug cannot have the freedom to mug, and the businessman cannot have the freedom to excessively pollute and pay no taxes. But get the balance between personal freedom, social order and ecological integrity right, and the vast majority of citizens can live happily with moderate personal freedom and minimal constraints.

Even after 63 years of independent, we still have lot of problems. Before independance British were ruling. Now politicians and big business man are ruling. Peoples are still not feeling independent. So question arises in my mind do we really got the freedom?? As I found in Bharat, there is a big barrier between the two classes. I think we need to be united and make the others to come with us. For me Bharat will be independent only when all have the same rights and no barriers between two classes. To make our Bharat, which is in every Bharatiys dream, we need to spread the knowledge, wealth and whatever you can do for others. I will be really feel we are independent when every single Bharatiya will feel he is safe, satisfied and happy in Bharat. I think its duty of every well educated person to educate at least one person who can't or not able to get the education facility. For me education is the only key to be independent.

Jai Hind.
Som

Sunday, August 1, 2010

SIDDHAGIRI MUSEUM........A village life

Today while surrffing on net I found one website which was very interactive and attractive. Looking at the site it looks a good initiative and well maintained project. On site it shows its purpose as to show the village life. A unique project, perhaps the only project in India situated at Shri Kshetra Siddhagiri Math, Kaneri, Tal. Karveer, Dist. Kolhapur. The place is near Kolhapur city on Pune Banglore Highway. Shri Kshetra Siddhagiri Math has a history of more than 1000 years, and is a holy place of worship of Lord Mahadeva. The surrounding around the museum is very calm and quiet, a hilly place with a good collection of Flora and Fauna.

you can find the more details on below link.

http://www.siddhagirimuseum.org

All the best to this project.

मैत्र.... ज्याला अर्थ कळला तोच खरा मित्र.

मैत्री दिन!!!
आज १ ऑगस्ट, या महिन्याचा पहिला रविवार, दर वर्षी प्रमाणे आज सगळे मैत्री दिन (Friendship Day) साजरा करेल. आपल्याकडे दिवस कोणी गेल्यावर घालतात... मग मित्र जिवंत असताना कसला दिवस पाळतात ते मला आता पर्यंत कळले नाही..... मैत्र.... ज्याला अर्थ कळला तोच खरा मित्र, एवढे पुरेस नाही का ?? त्यासाठी काही दिवस घालायची खरच गरज आहे का ?? जर मैत्रीची आठवणच करून दयायची असेल तर ती मैत्री कसली.

तरीही माझा तर्फे सर्व मित्रांना या मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्या..!!!


Wednesday, July 28, 2010

का कुणास ठाऊक...

का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही बोलावे.....पण शब्दच सुचत नाही.

का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही लिहावे.....पण शब्दच सुचत नाही.

का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही सांगावे.....पण शब्दच सुचत नाही.

का कुणास ठाऊक...
कधी वाटते काही मांडावे.....पण शब्दच सुचत नाही.

का कुणास ठाऊक...
कधी वाटते हे तर फार सोप आहे.....पण नेमकं तेव्हाच ते जमत नाही.

म्हणूनच म्हणतो .....का कुणास ठाऊक!!!